कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची मागणी

0

रत्नागिरी : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घेतली जावी, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंच संघटनेने केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या प्रमुख असलेल्या अधिपरिचारिकांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या विभागातील आठहून अधिक परिचारिकांना करोनाची लागण झाली आहे. काही परिचारिका निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून त्यांचे वयोमान झाले आहे. या कर्मचाऱ्यांना माणुसकीचा दृष्टिकोन बाळगून विशेष सवलत द्यायला हवी होती. जिवाची पर्वा न करता करोनाविरोधात लढणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी सर्वप्रथम घेण्यात यावी. प्रशासन योग्य रीतीने काम करीत आहे. मात्र ते करताना या कर्मचाऱ्यांचीसुद्धा काळजी घेणे जरुरीचे आहे, असे निवेदन महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रदेश सरचिटणीस संजय पुनसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 04-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here