रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पाउस पडत आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेतील सुमारे १५० दुकानातून पाणी शिरले आहे. व्यापारी आपला माळ इतरत्र हलवत आहेत. येथील नदीचे पाणी आता लवकरच पुलाला टेकण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत सुमारे ३ फुट पाणी असून पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे रत्नागिरी देवढे मार्ग पूर्णतः बंद झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:33 AM 04/Aug/2020