रत्नागिरी : शहरातील मांडवी येथील सदानंद वाडीत मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. येथील घरं सखल भागात असल्याने येथून वाहणाऱ्या गटाराचे पाणी देखील येथे साचून राहते. पाण्याची पातळी जास्त वाढल्यास येथील घरातून देखील हे पाणी शिरते अशी येथील नागरिकांची तक्रार आहे. येथून जवळच असणाऱ्या महादेव अपार्टमेंट येथे देखील अशाच स्वरूपाची समस्या आहे. मागील काही वर्षांपासून येथील नागरिक आवाज उठवत आहेत मात्र प्रशासन यावर कोणताही मार्ग काढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी या साचणाऱ्या दुषित पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:55 AM 04/Aug/2020