नागोठण्यात पुराच्या पाण्यात युवक गेला वाहून

0

रायगड : रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस धो धो कोसळत आहे. अतिवृष्टीने रायगडातील नद्यांना पूर आला आहे. महाड, माणगांव, पोलादपूर, श्रीवर्धन, अलिबाग, रोहा तालुक्यातील सखल भागात पाणी साचले आहे. दरड कोसळून, रस्त्यावर पाणी साचून काही भागात वाहतूक विस्कळीत झाल्याचेही वृत्त आहे. नागोठणे येथील एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला असून त्याचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे. महाड, माणगाव येथे अडकलेल्या दीडशे नागरिकांना प्रशासनाने सुस्थळी हलविले आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीने जिल्ह्यातील जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:22 PM 05-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here