रत्नागिरी : मुंबईकरांना आणू नका हा उपाय असू शकत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी पुढे यावे असे मत ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. डॉक्टरांच्या संघटनेशी सविस्तर बोलून यावर मार्ग काढण्यात येईल असे ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एकीकडे जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत आहे व दुसरीकडे आरोग्ययंत्रणा सक्षम नसल्याच्या कारणावरून चाकरमान्यांना कोकणात आणणे चुकीचे ठरेल असे निवेदन डॉक्टरांच्या संघटनेकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. याबाबत बोलताना ना. उदय सामंत यांनी हि प्रतिक्रिया दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:22 PM 06-Aug-20