ब्रेकिंग : मिऱ्या बंधाऱ्यासाठी १ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर

0

रत्नागिरी : दिलेला शब्द तंतोतंत पाळत ना. उदय सामंत यांनी आज झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत मिऱ्या बंधाऱ्याचा मुद्दा लावून धरला व कोव्हीड सारखे मोठे संकट असताना सुद्धा मिऱ्या वासीयांच्या मागणीला प्राधान्य देत मिऱ्या बंधाऱ्यासाठी तब्बल १ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर करून घेतला. आज रत्नागिरीत पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समुद्राच्या उधाणात मिऱ्या किनारपट्टीची धूप होत असून किनारपट्टीच्या नारळाच्या बागा देखील समुद्राने गिळंकृत केल्या आहेत. उधाणाच्या भरतीच्या वेळी मिऱ्या वासीय याच भीतीच्या छायेखाली असतात. आज मंजूर झालेल्या निधीमुळे पक्का मजबूत बंधारा बांधण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
05:06 PM 14/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here