रत्नागिरी : खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधित वाहतूकदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. राज्याचे परिवहन आयुक्त यांच्या ६ ऑगस्ट २० च्या पत्रानुसार खासगी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीत भाडेदर विचारात घेऊन खासगी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करुन निश्चित केले आहेत. शासन निर्देशानुसार गर्दीच्या हंगामाच्या अनुषंगाने खासगी बस मालकांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति किलोमीटर भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारात नसल्याची वेळोवेळी सातत्याने खातरजमा करण्यात यावी, असे आवाहन केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 19-Aug-20