नीट परीक्षेसाठी विद्यार्थी अडचणीत; मंत्री उदय सामंत यांनी वेधले केंद्र शासनाचे लक्ष

0

रत्नागिरी : देशव्यापी ‘नीट’ परीक्षा सप्टेंबर-२०२० मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. त्यांना गोवा येथे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. मात्र, कोरोना पार्श्वभूमीवर गोवा सरकारने त्यांच्या राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला स्वब टेस्ट बंधनकारक केली आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील परीक्षार्थी अडचणीत आले आहेत. एकतर या विद्यार्थ्यांना स्वब टेस्टमधून सूट द्यावी किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात या परीक्षेचे केंद्र द्यावे, अशी मागणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयाकडे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 21-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here