मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीचा अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. याच धर्तीवर उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमातही २५ टक्के कपात करावी, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटना व नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन आणि ऑल इंडिया सेटनेट टीचर्स संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रमातील २५ टक्के भाग कमी करावा केल्यास विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल. त्यामुळे अध्यादेश काढून विद्यापीठांना याबाबत सूचना द्यावी, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अॅड. मनोज टेकाडे यांनी केली आहे. या शिष्टमंडळात सरचिटणीस अॅड. अजय तापकीर, नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन संघटनेचे प्रा. कुशल मुडे, प्रा.भुपेश मुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:38 AM 21-Aug-20