वेंगुर्ले : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात वेंगुर्ले नगरपरिषदेला देश पातळीवर १५ वा तर महाराष्ट्रात १२ क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुढील स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळविण्याचे उद्दिष्ट असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले. यापूर्वी वेंगुर्ले न. प.ला देशामध्ये थ्री स्टार रँकिंगमध्ये (कचरामुक्त शहर) पहिल्या १२ मध्ये स्थान मिळाले होते. तसेच वेंगुर्ले शहराला ओडीएफ ++ चा दर्जा मिळालेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशात १५ वा क्रमांक आल्याने स्वच्छ सर्वेक्षण १८ व १९ मध्ये शिल्लक राहिलेली बक्षिसाची ५० टक्के सव्वासहा कोटी रुपये रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या काळात झालेल्या या सर्वेक्षणामध्ये हा क्रमांक मिळाल्याने त्यांचेही अभिनंदन होत आहे. दरम्यान, शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत कोरोना काळातही उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कामगारांचे कौतुक होत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:17 PM 21-Aug-20