हॉटेल गोपाळमध्ये सुचलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी सर्वांची धडपड सुरु झाली. काही झालेतरी हा उत्सव रत्नागिरीत करायचा असा चंग बधून हि मंडळी ना.उदय सामंत यांच्याकडे जाऊन पोहचली. ना. सामंत अथवा सामंत कुटुंबीय हे नेहमीच साऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाता आले आहेत. हि संकल्पना त्यांना सांगितल्यानंतर ना. उदय सामंत यांनी “आगे बढो” असे सांगून माझ्याकडून जे काही लागेल ते मी देईन पण हा उत्सव रत्नागिरीत साजरा झालाच पाहिजे असे सांगून प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरुवात केली. अनेकांना सोबत घेऊन एक मंडळ उभे केले आणि रत्नागिरीत २००८ साली गणेशोत्सव काळात राजाचा “दरबार” सुरु झाला लाखो भाविक या दरबारात राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी येऊ लागले.
(कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी गणेशोत्सवावर निर्बंध आले. याच पार्श्वभूमीवर श्री रत्नागिरीच्या राजाचा उत्सव यावर्षी न करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला. मात्र रत्नागिरी खबरदार या गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या उत्सवाच्या आठवणी शब्द सुमनांच्या रूपाने जागवणार आहे.)
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:37 PM 22/Aug/2020