रत्नागिरी : कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना काही कमी पडू देऊ नका. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, खबरदारी साठी आवश्यक असणाऱ्या साधनांची अजिबात कमतरता करू नका अशा शब्दात नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावले. आपले काम हाच धर्म हे मानून या संकटाच्या काळात जातपात, धर्मभेद न करता रत्नागिरी नगरपालिकेचे कर्मचारी कोरोना मृतांचे अंत्यविधी करत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते आपली सेवा बजावत आहेत. दिवसाला चार चार मृतदेहांचे अंत्यसंस्कार देखील या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहेत. आपल्या असुविधा त्यांनी आज नगराध्यक्षांच्या कानावर घातल्या. यावर नगराध्यक्ष बंड्या साळवी कमालीचे संतप्त झाले. कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील असुविधा ऐकून नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. या कर्मचाऱ्यांना कोणतीच कमतरता भासली नाही पाहिजे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:50 PM 31/Aug/2020