राजापूर : लॉकडाउनच्या काळात वाढीव दराने आलेली वीजबिले माफ करावीत, या मागणीचे निवेदन राजापूरच्या मनसेने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. आधीच लॉकडाउनमध्ये आर्थिक कोंडी झालेली असताना महावितरण कंपनीने आकारलेल्या वाढीव वीजबिले काढल्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. या वीजबिलांचा भरणा नेमका कसा करावा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. महावितरण कंपनीने आकारलेली मार्च ते मे अशी तीन महिन्यांची वीजबिले माफ करून जनतेला सहकार्य करावे, अशी मागणी मनसेने केली आहे. वाढीव आकाराने काढण्यात आलेले वीजबिल माफ करून महावितरणने लोकांना सहकार्य करावे. अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष राजेश पवार आणि सहकाऱ्यांनी महावितरणला हे निवेदन दिले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:13 PM 31-Aug-20