खबरदार इफेक्ट : सुरक्षा रक्षकांचे रखडलेले वेतन लवकरच मिळणार

0

रत्नागिरी : पॉलिटेक्निक विभाग रत्नागिरी येथे कार्यरत असणारे सुरक्षा रक्षक मागील दहा महिन्यापासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत याबाबतचे वृत्त रत्नागिरी खबरदार मधून प्रसिद्ध होताच त्याची दखल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी घेतली आहे. वित्त विभागाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने हि समस्या उद्भवली असून लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याच्या सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न निकाली निघणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:38 AM 03/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here