रत्नागिरी : मिरकरवाडा मच्छिमारी बंदराच्या पायाभूत सुविधांच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. चक्रीवादळ, ओखी आणि अन्य नैसर्गिक आपत्तीने मिरकरवाडा बंदराची हानी झाली होती. त्यासाठी ९५ कोटीचे आराखडा तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला प्राशसकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याच बरोबर रायगड जिल्ह्यातील आनंदवाडी आणि कारंजा मच्छिमार बंदराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्राकडून ३५ कोटीचा निधी देण्यात आला आहे. या बंदरांच्या विकासकामालाही अंतीम मंजुरी देण्यात आली आहे.