नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात तब्बल 86 हजार 432 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 40 लाखांच्या पार गेला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 लाख 23 हजार 179 झाला आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 69 हजार 561 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर गेल्या 24 तासात 1 हजार 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब ही की आतापर्यंत सुमारे देशात 31 लाख 7 हजार 223 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 8,46,395 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 05-Sep-20