संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठेसह, कडवई, आरवली, कसबा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका देवरुख आगाराला बसला आहे. प्रवाशांअभावी अनेक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सलग चार दिवस ग्रामीण भागातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णामूळे उपाययोजना म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्य बाजारपेठा बंद आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 07-Sep-20