रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नेवरे बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाची ही साखळी तोडण्यासाठी ३ सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस सकाळ सत्रात नेवरे बाजारपेठ खुली ठेवून दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औषधांची दुकाने व दवाखाने सुरू राहतील, तर अन्य सर्व व्यवहार बंद राहतील. ग्रामस्थांनी कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. तसेच गावात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्सचे पालन करणेही बंधनकारक आहे, असे आवाहनही ग्रामपंचायतीने केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 07-Sep-20