रत्नागिरी : कोल्हापुरातील वाढत्या कोरोना रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. याच संधीचा फायदा घेत घाट माथ्यावरील पर्यटकांनी विकएंड साजरा करण्यासाठी कोकण गाठले. या शनिवार रविवारी रत्नागिरी तालुक्यातील बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. या पर्यटकांची तपासणी करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा नसल्याचे दिसून आले आहे. रत्नागिरीत देखील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून येणाऱ्या पर्यटकांमुळे अधिक धोका निर्माण झाला आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:19 PM 14/Sep/2020