बीजेपी नगरसेवक आणि नगरपालिकेच्या कारभारावर आता ठेवण्यात येणार वॉच

0

रत्नागिरी : माजी नगराध्यक्ष कै. उमेश शेट्ये यांच्या पश्चात विरोधी पक्ष नगरपालिकेत अस्तित्वातच नाही असे चित्र निर्माण झाले आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी ज्या प्रश्नांवर बीजेपी नगरसेवक आकांडतांडव करीत होते त्याच प्रश्नांवर आता हे नगरसेवक मौनव्रत धारण करून आहेत. देशपातळीवरील सर्वात मोठा पक्ष म्हणून आज ओळखल्या जाणाऱ्या बीजेपी पक्षाचे अस्तित्वच सभागृहात नसल्यासारखे जाणवत आहे. याची गंभीर दखल बीजेपी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी घेतली असून बीजेपी नगरसेवक, नगरपालिकेचा कारभार आणि शहरातील नागरिकांचे प्रश्न यांच्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी आता तीन जणांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीत जिल्हा चिटणीस भैय्या मलुष्टे, प्रशांत डिंगणकर व जिल्हा कार्यकारीणी सदस्य राजीव कीर यांची निवड करण्यात आली आहे. आता या तिघांची समिती आता नगरपालिकेच्या कारभारावर करडी नजर ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:02 PM 14/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here