सावधान : वाहतुक नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर आता अत्याधुनिक कॅमेराद्वारे होणार कारवाई

0

◼️ नाक्यावर आता पोलीस नसले तरी जायचं कसं…शिस्तीत

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्यांची आता खैर नाही. वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. या अत्याधुनिक कॅमेराद्वारे मारुती मंदिर पासून सुमारे जुना माळ नाका इथपर्यंत अंतरावर लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर याद्वारे कारवाई केली जाणार आहे. म्हणजे आता नाक्यावर पोलीस जरी नसले तरी वाहनचालकांना शिस्तीतच जावे लागणार आहे. हळूहळू अशा पद्धतीने शहराच्या मुख्य नाक्यांवर हे कॅमेरे बसवले जाणार असून यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यास देखील पोलिसांना मदत मिळणार आहे. पोलीस यंत्रणेत नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी अत्याधुनिक बदल करणारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या अत्याधुनिक यंत्रणेचा उद्या शुभारंभ होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
07:22 PM 14/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here