चिपळूण : कामथे उपजिल्हा रुग्णालय केवळ कोरोना रुग्णांसाठी आहे. मात्र, इतर आजार असल्यास रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात आरोग्य तक्रार निवारण कक्ष सुरू करावेत, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चिपळूण तालुक्याचा विचार करता येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयात केवळ कोरोनाचे रुग्ण दाखल करून घेतले जातात. उर्वरित रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवेचे दर सरकारकडून निश्चित केलेले असताना त्याची अंमलबजावणी काही डॉक्टरांकडून होत नाही. नागरिकांच्या तशा तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तातडीने एक आरोग्य तक्रार निवारण केंद्र सुरू करावे, अशी मागणी मुकादम यांनी निवेदनात केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 16-Sep-20