मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरचा करोनाचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांच्या संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये आणखी २४७ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, दोघांचा मृत्यू देखील झाला आहे. कोरोनाबाधित पोलिसांची संख्या २० हजार ३ वर पोहचली आहे. यामध्ये ३ हजार ७२८ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर१६ हजार ७१ पोलिस करोनामुक्त झाले असून आतापर्यंत २०४ जणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:43 PM 16-Sep-20