मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर त्याचे महाराष्ट्रातून तीव्र आणि संतप्त पडसाद उमटत आहेत. आता भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी असते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे चांगली मिळकत होते. निर्यातबंदी घातल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज असून दु:खी झाला आहे. त्यामुळे आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल, ही आशा आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 16-Sep-20