राजापूर : राजापूर-कोल्हापूर-पंढरपूर तुळजापूर-लातूर बस सेवा सुरू करावी, अशी मागणी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी राजापूर आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचा प्रस्ताव रत्नागिरी जिल्हा एस. टी. विभाग नियंत्रक कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी दिली. राजापूर ते कोल्हापूर या दरम्यान दुपारच्या सत्रात एकही बस फेरी नाही. ही बस सेवा सुरू झाल्यास अनेकांना लाभ होईल. त्यामुळे ही बस फेरी तत्काळ मंजूर करून सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष अँड. खलिफे यांनी केली आहे. राजापूर-कोल्हापूर-लातूर बससेवा सुरु व्हावी, यासाठी आपण पालकमंत्री अनिल परब यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:10 PM 18-Sep-20