मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६२ हजार गुन्हे, तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल तर २५ कोटी ७९ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात दि.२२ मार्च ते १९ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,६२,२२० गुन्हे नोंद झाले असून ३५,७९५ व्यक्तींना अटक करण्यात आली. ९६,१७२ वाहने जप्त केली. यातील विविध गुन्हांसाठी २५ कोटी ७९ लाख ०३ हजार ५६४ रु. दंड आकारण्यात आला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 21-Sep-20