रत्नागिरी : शहरातील रस्ते आणि फुटपाथवर असलेले अतिक्रमणाविरोधात रनपच्या पथकाने कारवाईची जोरदार मोहीम हाती घेतली. गुरुवारी पाच जणांकडून प्रत्येकी पाचशे प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. शहरातील रस्ते आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण फोफावले आहे. या विरोधात नागरिकांच्या वाढत्या तक्रारी असल्याने गुरुवारी रनपचे अतिक्रमण हटाव पथक पुन्हा कार्यरत झाले. गुरुवारी जयस्तंभ ते साळवी स्टॉप आणि साळवी स्टॉप ते रामआळीचा संपूर्ण परिसर अतिक्रमण हटाव पथकाने पिंजून काढला. यावेळी पाच हातगाडीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय ज्या दुकानदारांचे रस्ता आणि फुटपाथवर सामान होते अशा दुकानदारांना कडक शब्दात समज देण्यात आली. गुरुवारी दुपारपर्यंत ही कारवाई करण्यात आली असून सोमवार नंतर कारवाई करताना कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:00 PM 25-Sep-20