रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीला दोन मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. सॅनिटायझर लावून हात स्वच्छ धुवावेत असे आवाहन ना. उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑक्सीजन प्लँट उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकाही लवकरच उपलब्ध होतील असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 28-Sep-20