घरगुती वादातून पत्नी आणि मुलाकडून मारहाण

0

राजापूर : तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथे घरगुती वादातून पतीला पत्नी व मुलाने काठीने व हातांनी मारहाण केली. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शनिवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३५ वा.सुमारास घडली. अस्मिता विलास नाचणकर आणि प्रफुल्ल विलास नाचणकर (दोन्ही रा.गोठणे दोनिवडे नाचणकरवाडी, राजापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात विलास रमेश नाचणकर (४५, रा. गोठणे दोनिवडे, नाचणकरवाडी, राजापूर) यांनी राजापूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार ही सर्व जण शनिवारी सायंकाळी घराशेजारील माळरानावर गुरे चरवण्यासाठी गेले होते. त्यावेळी विलास नाचणकर आणि त्यांची पत्नी अस्मिता व मुलगा प्रफुल्ल यांच्यात घरगुती वादातून बोलाचाली झाली. या रागातून संशयित अस्मिता हिने पती विलास यांना काठीने मारहाण केली. तर संशयित मुलगा प्रफुल्ल याने हातांच्या ठोशांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वालावलकर करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:29 PM 29-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here