‘राज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु’

0

कल्याण : सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर कल्याण रेल्वे पोलिसांकडून 107 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी (29 सप्टेंबर) कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात सुनावणी होती. या सुनावणीसाठी संदीप देशपांडे आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात हजर झाले होते. यावेळी देशपांडे यांनी “मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू” असा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. ‘आम्ही जे आंदोलन केलं ते लोकहितासाठी केलं. कायद्याची प्रोसिजर आता पार पाडत आहोत, मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं ज्यावेळेला राज साहेबांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब चुकता होईल. आता जो जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:08 PM 29-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here