नवी दिल्ली : कृषिकायद्याचे विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून नव्या कृषिकायद्याला विरोध म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. उत्तराखंडातील विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कृषिकायदाविरोधी आंदोलनात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर जाळल्याच्या प्रकरणी पंतप्रधानांनी टीका केली. शेतकरी ज्याची पूजा करतो ते जाळून विरोधकांनी आपले खरे रूप दाखविल्याचे ते म्हणाले. नव्या कायद्यानुसार शेतकरी आपला माल कधीही आणि कुठेही कोणाच्या मध्यस्थीशिवाय विकू शकतो. कायद्याला विरोध करणाऱ्यांना नफेखोरी करण्यासाठी दलाली हवी आहे. शेतकरी स्वतंत्र होऊ नये, अशीच त्यांची इच्छा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:49 PM 29-Sep-20