नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी भाजपाचे जेष्ठ नेते तसेच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्यासंह सर्व 32 आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयानंतर भाजपात उत्साहाचे वातावरण आहे. भाजापा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आडवाणी यांचे अभिनंदन केले आहे. तर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे आडवाणी यांच्या घरी पोहोचले आहेत. तसेच, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही यासंदर्भात ट्विट करत, न्यायालयाचा निकाल यायला उशीर झाला. मात्र निकाल अगदी योग्य आला, असे म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:32 PM 30-Sep-20