खेड : मास्क न वापरणाऱ्यांवर नगर परिषदेच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली. २२ जणांकडून ५०० या प्रमाणे दंड सोमवारी दिवसभरात वसूल करण्यात आला. मास्क वापरण्याबाबत सतत सूचना देऊनही बाजारपेठेत मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांवर नगर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली होती. भरारी पथकाकडून १२१ जणांना दणका दिला होता. त्यांच्याकडून ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला होता.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 02-Oct-20