रत्नागिरी : केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात आज काँग्रेसने रत्नागिरीत जोरदार निदर्शने केली. नव्या विधेयकांमुळे देशातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. हे विधेयक तात्काळ रद्द करावे, ही मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हाथरस येथील दलित मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर त्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचादेखील जिल्हा काँग्रेसने निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवण्यात आला. भाजपा सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करून घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:05 PM 02-Oct-20