मिर्‍या किनार्‍यावर अडकलेले ‘ते’ जहाज काढणार भंगारात

0

रत्नागिरी : 3 जूनला निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनार्‍याला जोरदार फटका बसला. या तडाख्यात मिर्‍या किनार्‍यावर बसरा स्टार जहाज अडकले. आज या जहाजाला किनार्‍यावर अडकून 4 महिने पूर्ण झाले. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या सर्वेअरनी केलेल्या सर्व्हेनंतर हे जहाज अखेर भंगारात काढण्याचा एजन्सीचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. अतिशय सुरक्षितपणे जहाजाची मोडतोड करून किनारा रिकामा केला जाणार आहे. सर्व्हेअरचा अहवाल गेल्यानंतर एजन्सीने जहाज दुरुस्तीवर अवाच्या सव्वा खर्च करण्यापेक्षा ते भंगारात काढण्याचा निर्णय झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:35 PM 03-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here