रत्नागिरीत कोणाची हिटलरशाही चालू देणार नाही : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : मागील सहा महिन्यापासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा जीव तोडून काम करत असून या कठीण प्रसंगी एखाद्या अधिकाऱ्यासाठी काम बंद ठेवण्याचा इशारा देणे, हि अशा प्रकारची हिटलरशाही जिल्ह्यात चालू देणार नाही असा सडेतोड इशारा ना. उदय सामंत यांनी दिला आहे. डॉ. बोल्डे यांना पदाभार न दिल्यास राजीनामा सत्र सुरु करू असा इशारा मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ भगवान पितळे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. मात्र या इशाऱ्यानंतर मॅग्मो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. भगवान पितळे यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचा खुलासा केला होता. कठीण आणि अडचणी परिस्थितीचा फायदा घेत आरोग्य यंत्रणा कुणी वेठीस धरू पहात असेल तर अशी हिटलरशाही जिल्ह्यात चालू देणार नाही असा इशारा ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:59 AM 08/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here