रत्नागिरी : राज्य शासनाने आयोजित केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घटले असून आता मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे. आतापर्यंत ७ हजार ९२९ रुग्ण पॉझिटिव्ह, तर पॉझिटिव्ह ७ हजार ३८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर व स्वच्छता आणि जबाबदारीपूर्वक सुरक्षित अंतर राखले तर येणाऱ्या काही दिवसात अतिशय चांगले परिणाम दिसणार आहेत, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 10-Oct-20