रत्नागिरी : कोल्हापूर येथून आलेला औषधांचा साठा कुणी मागवला याची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रांताधिताकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून त्यात सदस्य म्हणून जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, लेखाधिकारी (जिल्हाधिकारी कर्यालय प्रशासन विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबधित साठा घेवून येणार्या वाहतूकदारांची चौकशी समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याबरोबर समितीची बैठक झाली की त्यातून खरे पुढे येईल अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:13 PM 12-Oct-20