मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रावर एक पत्र लिहून मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावर टीका केली आहे. ‘तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केलं. दारूची दुकानंही सुरू केलीत. पण मंदिरं सुरू केली नाहीत. अशावेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही तर कुणाला आहे’, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:24 PM 13-Oct-20