मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 82 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले. तर 31 कोटी 48 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात 22 मार्च ते 14 ऑक्टोबरपर्यंत कलम 188 नुसार 2, 82, 523 गुन्हे नोंद झाले असून 41,291 व्यक्तींना अटक करण्यात आली. तसेच 96,583 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 31 कोटी 48 लाख 75 हजार 482 रु. दंड आकारण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:14 PM 15-Oct-20