रत्नागिरी : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाता-तोंडाशी आलेले भातपीक अनेक भागात आडवे केले. तर काही भागात सुकविण्यासाठी ठेवलेले भातपीक जोरदार पावसाने वाहून नेले. पावसाने हंगामाच्या चार महिन्यांत समाधानकारक वाटचाल केली. हंगामातील खरिपाच्या टप्प्यात पीकस्थिती उत्तम होती. मात्र परतीच्या पावसाने दाणादाण केल्याने अनेक भागात हाती आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे बळीराजाच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 16-Oct-20