राजापूर : मुंबई गोवा महामार्गावर सध्या अनेक ठिकाणी चौपदरीकरणाचे काम चालू आहे. राजापूर तालुक्यातील ओणी येथे या कामामुळे एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र त्यावरून दुहेरी वाहतूक होत असल्याने ओणी बाजरपेठेत वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. उड्डाण पुलाखाली काढण्यात आलेल्या दोन्ही रस्त्यांवरून दुहेरी वाहतूक सुरु असल्याने हि परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी अनेक वाहने पार्किंग केलेली असतात त्यामुळे एसटी गाड्यांना देखील यातून कसरत करीत मार्ग काढावा लागत आहे. अशा परिस्थितीमुळे येथे एखादा अपघात घडण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 16/Oct/2020