मुंबई : राज्य सरकारकडून सर्व महिला प्रवाशांना दि. १६ ऑक्टोबर घटस्थापनेच्या मुहूर्तावर लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी महिलांना रेल्वेनं प्रवास करता येणार नाही. रेल्वे प्रशासनाकडे राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला असून, त्यावर रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकार विचारविनिमय करणार आहे. त्यानंतरच महिलांसाठी रेल्वे प्रवासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 17-Oct-20