जि. प. भवनात लवकरच निपटारा कक्षाची स्थापना करणार

0

रत्नागिरी : सर्वसामान्य नागरिकांकडून आलेले तक्रार अर्ज, तसेच समस्यांच्या सोडवणुकीसाठी लवकरच जिल्हा परिषद भवनात समाधान कक्षासह निपटारा विभागाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली. ग्रामीण भागातून अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी जिल्हा परिषद भवनात येतात. त्या समस्यांसंदर्भातील अर्जाना उत्तर देण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो. ही बाब खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीतून पुढे आली होती. लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून आलेल्या अर्जावर तत्काळ उत्तर देण्याकरिता निपटारा विभाग स्थापन करण्यात येणार असल्याचे डॉ. जाखड यांनी सांगितले. समस्या, तक्रार अर्जाना वेळेवर उत्तरे देण्याची मानसिकता खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांनी स्वीकारावी, अशी अपेक्षा डॉ. जाखड यांनी व्यक्त केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 20-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here