रत्नागिरी : तहसिलदारांनी आपल्या यंत्रणेमार्फत येणाऱ्या चार दिवसात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सादर करावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. चिपळूण, गुहागर, खेड तसेच दापोली तालुक्यांमध्ये पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीच्या आढावा मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहातून दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतला. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे आदींसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 21-Oct-20