साखरपा : कनकाडी एसटी फेऱ्या बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीने देवरूख आगाराला निवेदन दिले. कनकाडी गावातून दिवसभरात साखरपा आणि देवरूख इथे जाण्यासाठी सहा एसटी फेऱ्या होत्या. या सहा फेऱ्यांपैकी केवळ एकच फेरी सुरू करण्यात आली. पण अवघ्या काही दिवसात ती बंद करण्यात आली. गावातील ग्रामस्थांना सध्या दाभोळे किंवा वांझोळे येथे आल्याशिवाय एसटी मिळत नाही. यासाठी तीन ते पाच किमीचा प्रवास पायी करावा लागत आहे. त्यामुळे रिक्षा केल्यास २०० रुपयांचा भूर्दंड पडतो. माजी उपसरपंच संदेश जाधव यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि ग्रामसेवक संतोष कांबळे यांना आपल्या सहीचे निवेदन देवरूख आगारात दिले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:17 PM 21-Oct-20