मुंबई : सरकारी वकिलाने सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात अनुपस्थित राहून जे गलथानपणाचे प्रदर्शन निषेधार्ह आहे. याचे गांभिर्य अशोक चव्हाण यांना नसल्यामुळे या उपसमितीचा त्यांनी स्वतः राजीनामा देणे गरजेचे असल्याचे शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आज पहिली आणि महत्वाची सुनावणी होणार होती. सुनावणीला सकाळी ११ वाजता सुरूवात झाली. पण राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी हजर न झाल्यामुळे ही सुनावणी काही काळासाठी तहकूब झाली होती. तर, याचिकाकर्ते व विरोधकांनी सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीमुळे सरकारवर टीका केली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांकडून पुन्हा एकदा केला गेला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:31 PM 27-Oct-20