अतिउत्साहीपणा अंगलट; मालगुंड समुद्र किनारी पर्यटकांची गाडी फसली वाळूत

0

रत्नागिरी : पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट आल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील मालगुंड समुद्र किनारी घडली. सांगली येथून गणपतीपुळे येथे चारचाकी वाहनातून पर्यटक आले होते. परिसर फिरण्यासाठी हे पर्यटक मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर पोचले. या पर्यटकांनी किनाऱ्यावर वाळूत गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता गाडी वाळूत फसली. एक फुटापर्यंत वाळूत फसलेली गाडी अखेर स्थानिकांनी प्रयत्न करून बाहेर काढली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:37 AM 30-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here