मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यामुळे सुरू झालेली राजकीय चर्चा थांबायला तयार नाही. यावरून खासदार संजय राऊत यांनी ‘उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं अयोग्य’ असा टोला राज ठाकरे यांना लगावला होता. या केलेल्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेत्यांच कामे करत नाहीत त्यामुळेच सगळ्यांना राज्यपालांकडे जाण्याची वेळ येते, असं त्यांनी शिवसेनेला सुनावलं. या आधी नेते राज्यपालांना भेटत नव्हते का असा सवालही दरेकर यांनी केला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:11 PM 31-Oct-20