रत्नागिरी : तालुक्यातील मेर्वी वरची म्हादये वाडी येथील महादेव म्हादये यांच्या गाईवर रविवारी दुपारी बिबट्याने हल्ला केल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतरही या भागात दुसरा बिबट्या असल्याचे त्याच दिवशी निष्पन्न झाले होतेच परंतु हा दुसरा बिबट्या जास्तच हिंसक झाल्याचे दिसत असून या चार दिवसात प्राण्यांवरचा त्याचा हा दुसरा हल्ला आहे. या हल्ल्यात गाय जखमी अवस्थेत सापडल्याने परिसरात पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 02-Nov-20